Current Affairs

‘ग्रंथालयांद्वारे समुदायांचे सक्षमीकरण- जागतिक दृष्टीकोन’या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दूरदर्शी प्रणालीद्वारे केले संबोधित

‘ग्रंथालयांद्वारे समुदायांचे सक्षमीकरण- जागतिक दृष्टीकोन’या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दूरदर्शी प्रणालीद्वारे केले संबोधित

 

तिरुवनंतपुरम् येथील कनकक्कुनू पॅलेस इथं पी. एन. पणिकर फाउंडेशन आयोजित ग्रंथालयांद्वारे समुदायांचे सक्षमीकरण- जागतिक दृष्टीकोनया विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला भारताचे उप-राष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.

भारताच्या ग्रंथालय आणि साक्षरता चळवळीचे प्रणेते पी. एन. पणिकर यांच्या दूरदृष्टीने प्रेरीत केरळमधील संघटित ग्रंथालय चळवळीच्या ८०व्या वर्षानिमित्ताने या समारोहाचे आयोजन कऱण्यात आले होते.

आपल्या संदेशात, उपराष्ट्रपती यांनी पी. एन पणिकर फाउंडेशनने, ज्ञान प्रसाराद्वारे वाचन संस्कृती, डिजीटल साक्षरता आणि समुदाय सक्षमीकरणाला दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाचे कौतुक केले.   फाउंडेशनचे  ब्रीदवाक्य- वायचु वलरुका‘(वाचा आणि वाढवा) समाजाला ज्ञान आणि समाविष्ट करून घेणारे असल्याचे नमूद केले.

ग्रंथालये, शिक्षणाची मंदिरे असून,तार्किक विचारक्षमतेला चालना देणारे आणि व्यक्ती आणि समुदायांना सक्षम करणारे स्थळ असल्याचे नमूद केले.

श्री आदि शं‍कराचार्यांनी आध्यात्मिक जागरूकता आणण्यासाठी आणि  विविध विचारांच्या एकत्रीकरणासाठी भारतभर प्रवास केला. असंख्य इतर ऋषी आणि विचारवंतानी त्यांच्या ज्ञानाने, करुणेने आणि दूरदृष्टीने आपली संस्कृती समृद्ध केल्याचे सांगितले. भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या मूल्यांविषयी बोलताना, उपराष्ट्रपतींनी महाकाव्यापासून ते आधुनिक ग्रंथालयांपर्यंत देशाच्या शैक्षणिक परंपरा राष्ट्राच्या ज्ञान आणि सामाजिक प्रगती यांचा शोध घेण्यास प्रेरणा देत आहे, असे निरीक्षण उपराष्ट्रपतींनी नोंदवले.

आजच्या डिजीटल युगात ग्रंथालये ज्ञानाची केंद्रे म्हणून काम करतात त्यामुळे लोकांना खरी माहिती मिळवणे आणि चुकीच्या माहितीचा प्रतिकार करण्यास सक्षम करत असल्याचं सी. पी. राधाकृष्णन यांनी अधोरेखित केले. तंत्रज्ञानामुळे माहितीपर्यंत सुलभ शिरकाव करता येतो तर ग्रंथालये समाजामध्ये वैचारीक खोली, चिंतन आणि अर्थवाही संवाद विकसित करतात असल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

आपल्या संदेशाचा समारोप करताना, उपराष्ट्रपती म्हणाले, ग्रंथालये ही शिक्षण,समावेश आणि नवोन्मेष यांसाठीच्या गतिमान जागा आहेत. ज्ञानाच्या ताकदीद्वारे  लोकांना सक्षम करून देशभरातल्या सार्वजनिक आणि सामुदायिक ग्रंथालयाचे जाळे भक्कम करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

***

सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

*** 

Visitor Counter : 78